Maharashtra

“पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाचे आमदार १०५ वरुन १५ होतील”

By PCB Author

February 18, 2020

मुंबई,दि.१८(पीसीबी) – महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात भाजपा २५ फेब्रुवारीला मोठा मोर्चा काढणार आहे. पण त्यासाठी कायकर्ते कुठून आणणार, आंदोलनासाठी भाजपा रोजंदारीवर लोकं आणणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी विचारला आहे.

नवाब मलिक म्हणाले, पुन्हा निवडणूका घ्या अशी मागणी भाजपवाले करत आहेत, पुन्हा निवडणूका होऊं द्या. पाच वर्षांनी निवडणुका होतील, तेव्हा भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल.

दरम्यान, सत्ता गेल्यामुळे भाजपाकडे आता कार्यकर्ते उरलेले नाहीत, कमळाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली आहे असे नवाब मलिक म्हणाले आहेत.