Pune

पुणे; परतीच्या पावसामुळे टांगेवाला कॉलनीत घराची भिंत कोसळून चौघांचा मृत्यू

By PCB Author

September 26, 2019

पुणे, दि. २६ (पीसीबी) – रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुणे शहरातील अनेक वस्त्या आणि नागरी वसाहतींना पाण्याचा तडाखा बसला. नाल्याचे पाणी टांगेवाला कॉलनीत शिरल्याने एका घराची भिंत कोसळली. त्यात पाच जण मरण पावले. त्यांचे  काही मृतदेह हाती लागले आहेत. त्यातील चौघांची ओळख पटली आहे.

रोहित भरत आमले (वय १३) संतोष कदम (वय ५५) सौ सौंदलीकर (वय ३२) आणि त्यांचा ९ वर्षाचा मुलाचा असे मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अन्य पाच जण बेपत्ता आहेत.

शहरात सलग दोन दिवसांपासून  पडणाऱ्या  परतीच्या पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला. मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सहकार नगर मधील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनीत घराची भिंत कोसळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत.  तर अन्य पाच जण वाहून गेले आहेत. त्यांची माहिती कळू शकली ऩाही. एनडीआरएफचे पथक शोध घेत आहेत.