पुणे, औरंगाबाद, हातकणंगले, जालना या जागांवर राष्ट्रवादी दावा करणार

0
469

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली.  पवार यांनी राज्यातील १७ जिल्ह्यांचा आढावा घेतला. राज्यातील ४८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे २५ जागांची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने पुणे, औरंगाबाद, हातकणंगले, जालना या जागा राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मागितल्या आहेत.