Maharashtra

पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

By PCB Author

September 11, 2021

मुंबई,दि.११(पीसीबी) – हवामान खात्यानं राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वाढल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 11 सप्टेंबर रोजी रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढण्याची शक्यता असून,12 आणि 13 सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.