पुढचे पाच दिवस पावसाचा कहर

0
307

पुणे, दि. ३ (पीसीबी) : यंदा वेळेवर आलेल्या मान्यूनमध्ये काही काळ खंड पडला. मात्र, थोड्याशा खंडानंतर अरबी समुद्रात मान्सूनला पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात सर्वदूर पाऊस पडेल. आज शुक्रवारी (3 जुलै) आणि शनिवारी (4 जुलै) अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा
मुंबईमध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. आज शुक्रवारी आणि शनिवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. पाच तारखेपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आहे. 6 आणि 7 तारखेनंतर पावसाचं प्रमाण कमी होईल. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 48 तास जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात अनेक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडेल. 5 तारखेला अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर पुढील 48 तासात नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे