“पी.चिदंबरम यांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती”

0
322

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे तब्बल १०६ दिवसांनी चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर काँग्रेसकडून ‘अखेर सत्याचाच विजय झाला, सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया देण्यात आली. यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती, असा ट्विटद्वारे आरोप केला आहे.