पी. चिदंबरम केवळ भुईला भार – के. पलानीस्वामी

0
494

चेन्नई, दि. १४ (पीसीबी) –  काँग्रेस नेते  व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आता केवळ भुईला भार आहेत, त्यांचे बोलणे कुणी गांभीर्याने घेऊ नये, अशा शब्दांत तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी निशाणा साधला आहे. 

केंद्र सरकारने तमिळनाडू हे जम्मू काश्मीरप्रमाणे केंद्रशासित राज्य करण्याचे ठरवले तरी अद्रमुक त्याला विरोध करणार नाही, असे विधान चिदंबरम यांनी  केले होते. या विधानाचा मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी खरपूस समाचार घेतला.

पलानीस्वामी म्हणाले की, चिदंबरम यांना केवळ स्वतच्या हिताची चिंता आहे त्यांना देशाशी काही देणेघेणे नाही. अनेक वर्षे केंद्रीय मंत्री राहूनही चिदंबरम यांनी कावेरी पाणी तंटय़ासह राज्याचे कुठलेही प्रश्न सोडवले नाहीत. पी. चिदंबरम यांनी कुठल्या योजना आणल्या ते सांगावे, ते किती वर्षे केंद्रात मंत्री होते. त्यांचा देशाला काय उपयोग आहे तर  काही नाही ते केवळ  भुईला भार आहेत.