पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही – निर्मला सीतारामन

0
341

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केले. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचे काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भाजपा कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांच्यासमोर आंदोलन केले आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली. मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

मात्र पीएमसी बँकेच्या खातेदारांची बाजू मी आरबीआयच्या गव्हर्नरसमोर मांडेन. यातून काही तोडगा काढता येईल का याबाबत चर्चा करेन असे आश्वासन निर्मला सीतारामन यांनी दिले.