पित्याच्या कर्तृत्वावर उध्दव ठाकरेंचे राजकारण; अजित पवारांचा पलटवार  

0
678

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – ग्रामीण भागात बाप, तर शहरी भागात वडील असा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. पाच वर्षे झाली, तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम रेंगाळले आहे. यावर  चांगल्या भावनेने भूमिका व्यक्त केली होती. मात्र, सत्य बोचल्याने त्यांना कोल्हापुरी मिरच्या झोंबल्या आहेत. त्यांनी माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली, तरी त्याकडे लक्ष देणार नाही. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या अग्रलेखातील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.