पिंपरी गावात दारु पिताना हटकल्याने चौघाजणांच्या टोळक्यांनी महिलेसह पती आणि मुलास केली जबर मारहाण

0
606

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – ये-जा करण्याच्या रस्त्यावर दारु पिण्यासाठी बसलेल्या चार जणांच्या टोळक्यांना महिलेने हटकल्याच्या रागातून टोळक्यांनी या महिलेसह तिच्या पती आणि मुलाला दगड आणि बाटलीने जबर मारहाण करुन जखमी केले. तसेच या महिलेचा ब्लाउज फाडून विनयभंग केला. ही घटना गुरुवार (दि.२१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपरी गावातील बालामन चाळीत घडली.

याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चारुदत्त हिरामन खुडे (वय २१), आशिष गुंजेकर (वय २२), रवि इंगळे (वय २३) आणि आशिष हिवाळे (वय २२) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपरी गावातील बालामन चाळीतील ये-जा करण्याच्या रस्त्यावर चौघे आरोपी दारु पीत बसले होते. यावर या ठिकाणी राहणाऱ्या महिलेने “हा ये-जा करण्याचा रस्ता आहे. इथे दारु पिऊन नका, इथुन निघुन जा”, असे आरोपींना म्हणाल्या. यामुळे रागावलेल्या आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत, “ही जागा काय तुझ्या बापाची आहे का”, असे म्हणून धक्काबुक्की करत विनयभंग केला. भांडणाचा आवाज अयकुन महिलेचे पती आणि मुलगा गौरव घराबाहेर आले आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी महिलेच्या ब्लाउज फाडून गौरव याला दारुच्या बाटलीने आणि दगडाने मारहाण केली आणि पसार झाले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक निमगीरे तपास करत आहेत.