पिंपरीत कौटुंबीक वादाला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

0
476

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – कौटुंबीक वादाला कंटाळून एका विवाहित तरुणाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.१५) पहाटेच्या सुमारास पिंपरी ते कासारवाडी लोहमार्गावर घडली.

दीपक बापू वारुडे (वय ३३, रा. संततुकारामनगर, मूळ गाव. मु. म्हाळसर, ता. शिंदखेडा, जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा बाणेर येथील आयटी कंपनीत कामाला होता. त्याला पत्नी आणि पाच वर्षीय मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या भावाचे लग्न असल्याने तो सहकुटुंब गावी गेला होता. यादरम्यान त्याचे घरच्यांसोबत कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. यामुळे त्याने घरच्यांना आत्महत्येची धमकी दिली आणि संततुकारामनगर येथील घरी निघून आला. तसेच बुधवारी पहाटे रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली.