Maharashtra

पाणी पुरवठ्यात अडचण येत असल्यास सांगा; मी म्हणजेच सरकार – पंकजा मुंडे

By PCB Author

July 07, 2019

परळी, दि ७ (पीसीबी) – राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. परतु बिड जिल्ह्यात पाहिजे तसा काय पाऊस न पडल्याने, अजून ही जिल्हाभरात टँकरदूवारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. हे टँकर नगरपालिकेचे नाहीत तर सरकारकडून देण्यात येत आहेत आणि आज सरकार मीच आहे असं विधान त्यांनी यावेळी केले.

राज्यात सर्वत्र पाऊस पडला पण बिड जिल्ह्याकडे पाऊसाने पाठ फिरवली आहे. बीड जिल्ह्यामध्ये अजूनही टँकरदूवारे पाणी पुरवण्यात येत आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांची भेट घेतली असता शहरातील नागरिकांनी पाणी वाटप करताना भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप केला.

दरम्यान, जुलैचा पहिला आठवडा उलटून गेला तरीही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे अजूनही नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती अजूनही भीषण आहे.