मुंबई, दि. १२ (पीसीबी) – भाजप सरकारच्या कारभारावर समाजातील प्रत्येक वर्ग आणि प्रशासनातील अधिकारीही नाराज आहेत. आता पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपत कोंडी झालेले लोकही बोलायला सुरुवात करतील. काही लोक भाजपमध्ये गेली, त्यांना गेल्या चार – साडे चार वर्षांमध्ये वापरण्यात आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अपेक्षित वागणूक दिली नाही. ती लोक आता बोलू शकतात. आतापर्यंत त्यांना बोलायची सोय नव्हती. मात्र, आता ते भाजपविरोधात बोलू शकतात, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.