Maharashtra

पाच राज्यांच्या निकालातून जनतेचा राग व्यक्त झाला आहे – संजय राऊत

By PCB Author

December 11, 2018

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसचा विजय झाला असे मी म्हणणार नाही. मात्र, जनतेचा असलेला राग यातून व्यक्त झाला आहे, असे सांगून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर  निशाणा साधला आहे.

सध्याच्या कलांनुसार तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता  संपुष्टात येऊन काँग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहे. अद्याप मतमोजणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी राऊत दाखल झाले आहेत, यावेळी ते बोलत होते. या निकालांमुळे आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी मोदी सरकारचे नांव न घेता सांगितले. कुणाला? या प्रश्नावर बोलताना ‘समझनेवालोंको इशारा काफी है,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.