पाकिस्तानला स्पर्धेबाहेर घालविण्यासाठी भारत पराभूत होणार

0
815

लंडन, दि. २७ (पीसीबी) – पाकिस्तान क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका आणि न्यूझिलंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून पुन्हा एकदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यापरिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्यापासून रोखण्यासाठी भारत बांग्लादेश आणि श्रीलंका विरोधातील सामने मुद्दामून परावभव पत्करेल  असा अजब दावा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू बसीत अलीने केला आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर धक्कादायक विजय मिळवला. यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या आहेत. इंग्लंडलाही पराभवाचे दोन धक्के बसले असून त्यांच्यासाठी पुढील वाट बिकट झाली आहे. तर पाकिस्तान १९९२ची पुनरावृत्ती करेल अशी चर्चा रंगू लागली आहे.

‘पण भारतीय संघ पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठू देणार नाही. पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू नये, यासाठी भारत जाणूनबुजून खराब प्रदर्शन करून बांग्लादेश आणि श्रीलंकेविरोधात पराभव पत्करेल’ असे मत माजी क्रिकेटपटू बसीत अली याने व्यक्त केले आहे. एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे.