Maharashtra

पवार साहेब नसते तर उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ बाहेर गोट्या खेळत बसले असते – निलेश राणे

By PCB Author

December 26, 2019

मुंबई,दि.२६(पीसीबी) – महाविकास आघाडीचं सरकार येण्यामागं शरद पवारांचा चमत्कार आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हा माणूस स्व. बाळासाहेबांना विसरला. ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर शिवसैनिक घडवला त्यांचाच मुलगा त्यांना विसरून रोज पवार साहेबांचे गुणगान गातोय. कारण सोप्पं आहे, पवार साहेब नसते तर हे मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते, अशी कडवट टीका राणे यांनी केली आहे.

हा माणूस स्व. बाळासाहेबांना विसरला. ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर शिवसैनिक घडवला त्यांचाच मुलगा त्यांना विसरून रोज पवार साहेबांचे गुणगान गातोय. कारण सोप्पं आहे, पवार साहेब नसते तर हे मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते. https://t.co/kcGtJksyP4

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 25, 2019

निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रत्येक मुद्द्यावर झोडपण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. कारण त्यांनी बुधवारी दिवसभरात दोन-तीन ट्विट करत सेनेला चांगलंच धारेवर धरलं.