पवार साहेबांमुळेच धोनी कर्णधार झाला : जितेंद्र आव्हाड

0
363

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्तापर्यँतच्या कामगिरीवरती प्रकाश टाकणारे लेख लिहीत आहेत. गेली 27 दिवस ते याबद्दल लिहित आहेत. आज या लेखातला 27 वा लेख आव्हाडांनी लिहिला आहे. ‘साहेब माझे विठ्ठल’ या शीर्षकाखाली कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, या क्षेत्रांतला पवारांचा वावर यावर आव्हाड बोलते होत आहेत. आजच्या लेखातून क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड कशी झाली? अन् शरद पवारांनी त्यात कशी भूमिका बजावली? या बद्दलच्या घटनांचा उल्लेख त्यांनी लेखात केला आहे.

“2008 चा तो काळ होता.BCCI चे अध्यक्ष होते पवार साहेब. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता.त्यावेळी संघाचा कर्णधार होता आपल्या सर्वांचा आवडता खेळाडु राहुल द्रविड.पवार साहेब देखील Bcci अध्यक्ष या नात्याने आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर होते. दौरा सुरू असताना एक दिवस अचानक राहुल द्रविड पवार साहेबांना भेटायला आला.साहेब ब्रेकफास्ट करत बसले होते.साहेबांनी द्रविडच स्वागत केलं आणि अचानक येण्याचं प्रयोजन विचारलं.द्रविड साहेबांना, “मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा..!” असे म्हणाला. चालु दौऱ्यात द्रविड सारखा खेळाडू अशी मागणी करतोय हे पाहून साहेबांना नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसला. यावर साहेबांनी द्रविड ला विचारले की, “इंग्लंड दौरा सुरू असताना,आणि या दौऱ्यावर तू कॅप्टन असताना असा तडकाफडकी निर्णय कसा घेता येईल..? दुसरं म्हणजे हे निर्णय मी घेत नाही.यासाठी तू निवडसमितीकडे जायला हवं..कारण हा निर्णय पूर्णतः निवड समितीचा असतो. तरीदे खील द्रविडने साहेबांकडे,’मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळीक द्या,माझ्या व्यक्तिगत कामगिरीवर या जबाबदारीमुळे परिणाम होतो’ हा धोशा कायम ठेवला. तो ऐकत नाही म्हटल्यावर साहेबांनी द्रविडला पर्यायी कर्णधाराच नाव सुचवायला सांगितले.द्रविडने यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच नाव साहेबांना सुचवलं. साहेबांनी मग सचिनला कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल विचारलं.सचिनने देखील कामगिरीच कारण देत कर्णधारपद स्वीकारण्यास प्रांजळपणे नकार दिला.
दौरा सुरू होता आणि या दौऱ्यात संघाचे दोन्ही दिग्गज खेळाडू कर्णधारपदासाठी तयार नव्हते. शेवटी शेवटचा उपाय म्हणून साहेबांनी मग त्या दोघांनाच योग्य व्यक्तीच नाव सुचवायला सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे दोघांनी मिळून एकच नाव घेतले. ते नाव होत ‘महेंद्रसिंग धोनी’.”

साहेबांनी यावर विचार केला. सचिन आणि द्रविड सारखे खेळाडू धोनी च नाव घेतायत म्हटल्यावर साहेबांनी मोठ्या विश्वासाने हे नाव निवडसमितीला सुचवलं. दिलीप वेंगसरकर त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते.धोनीच्या नावावर सचिन ,राहुल आणि खुद्द BCCI अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती. निवड समितीने धोनीला कर्णधार बनवत असल्याचा निर्णय जाहीर केला..! पुढे याच महेंद्रसिंग धोनीने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात इतिहास घडवला.” असं आव्हाड म्हणतात.