पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली; भाजप नेत्याची जहरी टिका

0
288

मुंबई,दि.२६(पीसीबी) – सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

“सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की करोना संपला तर मग तसं जाहीर करा. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावरून अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

दरम्यान “सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहेत. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका करोनाच्या काळातच झाल्या होत्या याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.” असं म्हणत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून राऊतांवर निशाणा साधला.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1309718227430199296/photo/1