मुंबई,दि. २५(पीसीबी) – अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांच्या मनधरणीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोनवेळा प्रयत्न झाले. मात्र, त्यांनी परत येण्यास नकार दिल्याचे समजते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करुन भाजपवर टीका केली आहे.
शरद पवार यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे,पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील. असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
मा. शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील. #SharadPawar pic.twitter.com/6N6g5dBS10
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 24, 2019