पवना धरण १०० टक्के भरले; पाण्याची चिंता मिटली   

0
377

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्याची जीवनदायिनी असलेले पवना धरण या वर्षी पंधरा दिवसआधीच १०० टक्के भरल्याने वर्षभराच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जुलै महिन्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी इतका पाऊस झाल्याने १५ ऑगस्टपर्यंत भरणारे धरण यंदा लवकर भरले आहे. त्यामुळे पिंपरी–चिंचवड शहराला वर्षभरासाठी लागणाऱ्या पाण्याची तजवीज झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त केले जात आहे.