Maharashtra

पराभवाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

By PCB Author

October 06, 2019

जालना , दि. ६ (पीसीबी) –  जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झाले. गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला  आहे. असे त्यांनी सांगून आपणाला विजयी करण्याचे आवाहन केले.

लोकांच्या अडचणीच्या काळात, सुख-दु:खात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मते मिळतात, असे सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या,  असेही आवाहन त्यांनी यावेळी  केले.

गावकऱ्यांनी देखील चौधरी यांना अश्रू अनावर होताच त्यांची समजूत घालत या निवडणुकीत त्यांना साथ देण्याचे आश्वासन दिले.  दरम्यान, चौधरी यांनी आतापर्यंत २ विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.