Pune

पराभवाची धूळ चारली, तरी राहुल गांधींची आरोप करण्याची हौस कायम- निर्मला सीतारामन

By PCB Author

August 27, 2019

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पराभवाची धूळ जनतेने  काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चारली आहे. तरीही त्यांची आरोप करण्याची हौस फिटलेली नाही. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप करण्याआधी पक्षातील वरिष्ठांसोबत चर्चा करावी, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  आज (मंगळवार) लगावला.

निर्मला सीतारामन यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गंगाजळीतील रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. हा निर्णय आरबीआयकडून चोरी करण्यासारखाच आहे,  अशी टीका  राहुल गांधी यांनी केली होती.  या टीकेला  सीतारामन यांनी उत्तर दिले.

राहुल गांधी हे जेव्हा चोर, चोरी असे मुद्दे बाहेर काढून केंद्र सरकारवर  आरोप करतात.  तेव्हा एक गोष्ट माझ्या मनात येते की ते चोर, चोरी या मुद्द्यावरुन जोरकसपणे आरोप करतात. त्यानंतर देशाची जनताच त्यांना त्यांच्या आरोपांचे चोख प्रत्युत्तर देते, असेही सीतारमण म्हणाल्या.