मुंबई, दि.२२ (पीसीबी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याही अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येतेय. कारण, आता परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका उद्योजकाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह आणखी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.