नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी परदेशातील काळा पैसा भारतात परत आणणार, असे आश्वासने दिले होते. त्यानंतर ते सत्तेवर येऊन साडेचार वर्षे पूर्ण झाले, तरीही त्यांना परदेशातून एक काळा पैसा भारतात आणता आलेला नाही. यासंदर्भात भारतीय वन सेवेतील अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती मागविली होती. मात्र, माहिती देण्यास कार्यालयाने नकार दिला आहे.