नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात परदेशातील काळा पैसा आणणार, अशा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, सत्तेवर येऊन मोदी सरकारला साडेचार वर्ष होत आली आहेत. अद्यापही परदेशातून एक दमडीही मोदींना भारतात आणता आलेली नाही. दरम्यान, परदेशातून किती काळा पैसा देशात आला? त्यातील किती पैसे लोकांच्या खात्यात टाकले, याबाबतची माहिती १५ दिवसांत देण्याचे आदेश माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) दिले आहेत.