पप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे

0
998

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – पाच राज्यांमध्ये आलेले कल हे काँग्रेसच्या बाजूने आहेत. देशात मोदी आणि भाजपची वागणूक जशी होती, त्यामुळे हे होणारच होते. त्यामुळे मी पाच राज्यातील जनतेचे अभिनंदन करतो, त्यांनी यानिमित्त चांगला पायंडा पाडला. त्यामुळे पप्पू आता परमपूज्य झाला, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.  

राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते  म्हणाले की, या निकालांमुळे मी पुन्हा एकदा गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करेन. कारण त्यांनी पहिल्यांदा मोदींना झटका दिला. मागच्या निवडणुकीत १६५ वर असणाऱ्या भाजपाला त्यांनी ९९ वरती आणले. त्यानंतर कर्नाटकात झालं आणि आता तेच पाच राज्यांत दिसतं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुजरात, कर्नाटकमध्ये एकटेच लढले होते, त्याचबरोबर त्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये चांगली मेहनत घेतली, असे राज ठाकरे म्हणाले.