पुणे,दि.१८ (पीसीबी)- पक्ष सोडून गेल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सर्वांना दिसलंच आहे, असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
सध्या आमदार फुटीच्या बातम्या येत आहेत. या बातम्या खोट्या आहेत. अनेक आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे फुटाफुट होणार नाही. तसेच पक्ष सोडून गेल्यास काय होतं याचं उदाहरण साताऱ्यात दिसलंच आहे, असं ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता पुढे कुणी पक्ष सोडण्याचा विचार करणार नाही, असंही पवार म्हणाले आहेत.