मुंबई,दि.२(पीसीबी) – पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, अशा शब्दांत मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
आशिष शेलार यांनी, “राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू…आहेत त्या ८ टिकल्या तरी खूप झाले” असा टोला राष्ट्रवादीला लगावला होता. यावरून धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, असं आशिष शेलार म्हणाले होते.