Maharashtra

पक्षाला गरज असताना राहुल गांधी मैदान सोडून पळाले – रावसाहेब दानवे

By PCB Author

July 07, 2019

मुंबई, दि ७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव हे आपले अपयश आहे यांची जबादारी घेत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर राजीनाम्यावरुन निशाणा साधला आहे. पक्षाच्या उमेदीच्या काळात गांधी घरण्याने काँग्रेस अध्यक्षपद भोगले. परंतू आज पक्षाला खऱ्या अर्थाने उभारी देण्याचे काम असताना राहुल गांधी मैदान सोडून पळत आहेत.

इतकेच नव्हे तर भाजपच्या सुरुवातीच्या काळात केवळ दोन खासदार निवडून आले म्हणून टिंगल-टवाळी करण्यात आली. परंतु कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे केंद्रात सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार सत्तेवर आले. दुसरीकडे दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली? काँग्रेसला संघटनात्मक मजबूत करण्याची गरज असताना राहुल गांधी व गांधी घराणे मैदान सोडून पळ काढत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.