पक्षांतर करून गेलेल्यांमुळे कोणतीही पोकळी निर्माण झालेली नाही – अमोल कोल्हे

0
526

परभणी, दि. २३ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे . आतापर्यंत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या तर जे निवडून येऊ शकतात त्यांच्याविषयी पक्षांतरांच्या अफवा पसरविण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. अर्थात जे जात आहेत, त्याने कोणतीही पोकळी निर्माण झालेली नाही. सध्याचे सत्ताधारी जातिधर्माच्या नावावर विष कालवून तरुणांना भरकटवत आहेत, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा परभणी येथे पोहोचली. खासदार अमोल कोल्हे यांनी युवा संवाद कार्यक्रमात तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिंतूर येथील जाहीर सभा व परभणीतल्या पत्रकार परिषदेत सरकारवर टीका केली. कोणाच्याही दडपशाहीला बळी न पडत तरुणांनी मतदानाच्या शस्त्राद्वारे आपली भूमिका पार पाडावी असे आवाहन, कोल्हे यांनी केले.