पंतप्रधान मोदींनी पाच राज्यांच्या निकालावर बोलणे टाळले

0
425

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – हिवाळी अधिवेशनाला आजपासून (मंगळवार)  सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांवर बोलणे त्यांनी स्पष्टपणे टाळले. यावरुन भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे स्पष्ट होत आहे.