न्याय मागितला, तर तुरूंगात टाकणारे भाजप सरकार – छगन भुजबळ

0
475

वैजापूर, दि. २५ (पीसीबी) – साठ वर्षांच्या लढाईनंतर ओबीसींना २७ टक्के आरक्षण मंडल आयोगामुळे मिळाले आहे. परंतु आता मराठा आरक्षणामुळे या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची जनगणना कायद्याच्या चौकटीत न करता ५४ टक्के असलेल्या ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जणगणना करण्यात यावी, अशी मागणी समता परिषदेचे नेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.