नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस पक्ष चालवण कठीण – रंजन चौधरी

0
386

दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – नेहरु-गांधी परिवार हे काँग्रेसचे ब्रँड इक्विटी आहेत. नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस पक्ष चालवणं कठीण आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी केले आहे.

काँग्रेससारखा मजबूत विचारधारा असलेला पक्ष, ज्याची प्रत्येक ठिकाणी पोहोच आहे, भाजपच्या जातीयवादी रथाला रोखण्याची ताकद आहे. मात्र प्रादेशिक पक्ष ज्यापद्धतीने काम करत आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसांत ते आपले महत्व हरवून बसतील, असे चौधरी म्हणाले आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदाची जबाबदारी नको होती. पण राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर संघटना संकटात आल्याचे पाहता ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर त्यांनी हे पद स्वीकारले, असे चौधरी यांनी सांगितले आहे. दरम्यान, स्वातंत्र्यापूर्वीपासून काँग्रेस गांधी-नेहरु कुटुंबीयांशी संबंधित आहे. आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी आपले जीव गमावले आहेत, असही चौधरी यांनी म्हटले आहे.