Notifications

निवडणूक अर्ज भरताना उमेदवारांना ५०० शब्दांत लिहावा लागणार विकासाचा संकल्प

By PCB Author

August 22, 2018

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचा संकल्प काय असणार आहे, ते किमान पाचशे शब्दांत लिहावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना हे विकासाचा संकल्प नमूद करावे लागणार आहे. निवडून आल्यानंतर हा संकल्प पूर्ण न झाल्यास संबंधिताचे नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते.