Desh

निवडणुक आली की भाजपला राम मंदिराची आठवण होते आणि निवडणुकीपश्चात विसरही पडतो – दिग्विजय सिंह

By PCB Author

October 03, 2018

पाटणा, दि.३ (पीसीबी) – निवडणूक आली की भाजपला राम मंदिराची आठवण होते आणि निवडणुकीपश्चात विसरही पडतो, अशी खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह  यांनी केली आहे. ते पाटणा येथे बोलत होते.  राम मंदिराच्या प्रश्नासोबतच दिग्विजय यांनी भाजप सरकारवर राफेल घोटाळ्यावरूनही तोफ डागली. राफेल विमान खरेदीप्रकरणी विरोधी पक्षांकडून विमानाची किंमत विचारली जात असताना सत्ताधारी पक्ष गप्प का? असा सवाल दिग्विजय यांनी उपस्थित केला. राफेल घोटाळ्यावरून दिग्विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचाही ठाम विश्वास दिग्विजय यांनी यावेळी व्यक्त केला. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर प्रतिक्रिया न देता यावर खरंतर पंतप्रधानांनीच उत्तर द्यायला हवे, असे दिग्विजय म्हणाले.