“निवडणुकी आधी जे भाजपात गेले त्या सगळ्यांची वाट लागली”

0
409

बीड,दि.२८(पीसीबी) – महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारांची भावना होती की एक पक्ष बाजूला ठेवा. चार पक्ष एकत्रित या आणि सत्ता स्थापन करा पण भाजपला बाजूला ठेवा, असं बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

अनेकांना वाटत होतं भाजप सत्तेवर येणार. तसं वाटल्यामुळे जे जे भाजपच्या वाटेवर गेले त्या सगळ्यांची वाट लागली, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं आहे.

तुमच्या भावनेतून निर्माण झालेलं हे सरकार आहे. म्हणून तुमच्या भावना हे महाविकास आघाडीचं सरकार कधीही दुखावणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.