Maharashtra

निवडणुकीनंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील होईल   

By PCB Author

October 18, 2019

काटोल, दि. १८ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत सामील  होईल,  असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी  केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजप सत्तेमध्ये कोणालाच नको आहे, अगदी शिवसेनेलासुद्धा, त्यामुळे निवडणूक निकालात कल हा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने लागेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.  राज्यात सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी स्थापन करेल. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मग शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख  काटोल नरखेड मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून चरणसिंह ठाकूर रिंगणात उतरले आहेत. २०१४ साली काटोलमधून आशिष देशमुख निवडून आले होते, पण २०१८ मध्ये त्यांनी आमदारकीचा आणि भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता.