Maharashtra

निवडणुकीच्या दोन महिनेआधी आमच्यात सेटलमेंट, नंतर फक्त नाटक  होतं – रावसाहेब दानवे

By PCB Author

June 08, 2019

जालना,  दि. ८ (पीसीबी) – शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकीच्या दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती. नंतर फक्त नाटक सुरु होते,  असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

आज (शनिवारी) जालना येथे रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दानवे बोलत होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यानंतर दानवे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवला आहे. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते आणि जालन्यातील प्रतिष्ठीत लोकांनी दानवे यांचा गौरव केला.

दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीत दानवेंना अस्मान दाखवू, असा निर्धार केला होता. परंतु युतीनंतर ही जागा भाजपला मिळाली. तरीही खोतकरांनी दानवेंविरोधात लढण्याचा इरादा बोलून दाखवला होता. मात्र युतीनंतर त्यांची दिलजमाई झाली होती.