औरंगाबाद , दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीआधी हार्ट अटॅक येऊन मी मेलो का नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेतील पराभवावर भावूक प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात खैरे बोलत होते.
चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले चंद्रकांत खैरे यांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला. या पराभवावर बोलताना खैरे म्हणाले की, शिवसेनेत संघटनात्मक बदलाची गरज आहे. ज्यांना मी मोठे केले, त्या सर्वांनी आज माझ्या विरोधात काम केले, याचे वाईट वाटत आहे.
शिवसेनेला पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टर हे चिन्ह कारणीभूत होते. त्या ट्रॅक्टरवर शिवसेनेतील अनेक जण बसले. आता त्यांना माफ करु, कारण असे केले नाही, तर समाजात दुही निर्माण होईल, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.