निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवणे, हा भाजपचा इतिहास – जयंत पाटील

0
408

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – निवडणुका जिंकण्यासाठी  दंगली घडवणे, हा आजपर्यंतचा भाजपचा  इतिहास आहे,  असा निशाणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  ट्विट करून साधला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला भाजपच जबाबदार आहे, असाही आरोप पाटील यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपप्रेरित आहे. हे वेगवेगळ्या पुराव्यांवरून समोर आले आहे.   पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे  दिसून येत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने दंगली घडवल्या आहेत,  हा आजपर्यंतचा इतिहास आहे,  असे  पाटील यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत  पराभव समोर दिसत असल्याने भाजप मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे.  भाजपने येत्या काळात औपचारिक आणीबाणी जाहीर केली, तर आश्चर्य वाटायला नको,  असेही पाटील यांनी ट्विटमध्ये  म्हटले आहे.