मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. या राज्यात आता निवडणुका लागल्या आहेत. तिथे भारनियमन नको म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा या राज्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात १० तास अघोषित भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन राजकीय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.