मुंबई, दि. ८ (पीसीबी) – आमच्यासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येक मतदारसंघ महत्वाचा आहे. लोकांना लढायची इच्छा आहे, हे पक्षासाठी चांगले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच ‘ना पार्थ, ना शरद पवार, आमच्या घरातून केवळ मीच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.