‘… नाहीतर मुंबई पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाउन करणार’; पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा

0
223

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : २०२० साली आलेली करोना साथ आटोक्यात येतीये म्हंटल्यावर सगळीकडे कामकाज नियम पाळून पुन्हा सुरु करण्यात आले. पण आता २०२१ मध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वरती काढतोय. मुंबईत करोना रुग्णसंख्येत फेब्रुवारी पासून वाढ होऊ लागली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला असून, आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता चिंता वाढली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.कि, जर परिस्थिती बिघडली ‘तर मुंबईत पुन्हा लॉकडाउन केलं जाईल’, असा इशारा त्यांनी दिला आहे.

त्यामुळे सरकारने कोरोना परिस्थितीत नवीन नियमावली जाहीर केली आहे. यावर पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, ”रुग्णसंख्या वाढत आहेत, हे मान्य करावं लागेल. आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. आता आम्ही कारवाईही सुरू केली आहे. लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेतली जाते. पण, प्रत्यक्षात ३०० ते ४०० लोकांना बोलवतात. अशा लोकांवर कारवाई सुरू केली आहे. नाईट क्लबवरही कारवाई सुरू केली आहे. सरकारनं नियमावली ठरवून दिली आहे, तरीही ज्या रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जातो, त्यांच्यावरही कारवाई सुरू केली आहे. त्यांचे परवाने रद्द केले जातील. सरकार म्हणून जे करणं शक्य आहे, ते आम्ही करतोय. पण, मुंबईकरांना परत लॉकडाउन बघायचा नसेल, तर त्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे’, अस सांगत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी जर परिस्थिती बिघडली तर पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करणार असल्याचा इशारा दिला आहे.