मुंबई, दि.२५ (पीसीबी) –
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल
,
असे भाकित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केले होते.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले
, ‘
नारायण राणे भविष्यकार आहेत का
?
असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी राणेंवर टीका केली आहे.
बोलताना पाटील म्हणाले
, ‘
ते स्वतःचे भविष्य बनवू शकले नाही तर ते दुसऱ्या
चे
काय सांगणार
? ‘
महाविकास आघाडीचे काम जोरात सुरु झाले असून
,
ज्यांना भाजपाने बकरा केला
,
त्यांनी अकराच्या गोष्टी सांगू नये
,
असा खोचक सल्ला पाटील यांनी राणे यांना दिला.