नारायण राणे जिथे जातात, तिथे वाट लावतात – उध्दव ठाकरे

0
512

कणकवली, दि. १६ (पीसीबी) – नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजप प्रवेशा दिल्याबद्दल भाजपाला शुभेच्छा ! राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्यावेळी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, असे सांगून राणे जिथे जातील तिथे वाट लावतात.  आधी काँग्रेसची आणि आता स्वत:ची विल्हेवाट लावली, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) येथे केली.

शिवसेनेचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत ठाकरे बोलत होते.

ठाकरे म्हणाले की, माझा कुठल्या व्यक्तीविरुद्ध लढा नाही. कोकण विरुद्ध खुनशी वृत्ती असा हा लढा आहे.   मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हटल्यावर याला सातबारा कळतो का ? असे कोणीतरी म्हणाले. मी कोणाच्या जमिनी बळकावल्या नाहीत. जमिनी हडप केल्या नाहीत. त्यामुळे मला सातबारा कळत नाही, असा टोला उद्धव यांनी लगावला.

मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस, मला काय शिकवतोस अशा शब्दात उद्धव यांनी राणेंवर प्रहार केला. देवेंद्र फडणवीसांनी राणेंना पाच वर्ष थांबायला सांगाव बघा ते थांबतात का? असे उद्धव म्हणाले. भाजपाकडून भ्रम निरास झाल्यावर बघा हेच राणे काय बोलतात ते. गुंडगिरी मोडून तोडून टाकली म्हणून कोकण भगवे झाले, असे उद्धव म्हणाले. रमेश गोवेकर कुठे गायब झाले? खुनशी वृत्ती अजिबात सहन करणार नाही. मी भाजपावर टीका करायला आलेलो नाही,असेही ठाकरे म्हणाले.