नारायण राणेंचा शिवसेना सोडण्याचा निर्णय चुकला – नितीन गडकरी  

0
860

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – शिवसेना सोडण्याचा राणे यांचा निर्णय चुकीचाच होता. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करू नये, म्हणून मी त्यांची मनधरणी करण्याकरिता आठवडाभर दररोज त्यांच्या निवासस्थानी जात असे; पण राणे यांनी निर्णय घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात त्यांनी चूकच केली होती, असे मत केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मराठी आणि इंग्रजी भाषांमधील ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या  आत्मकथन पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  करण्यात आले. याप्रसंगी गडकरी बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, देशात जे नाही ते महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात जे आहे ते कुठेच नाही. दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे महत्त्व कळले,  अशीही  भावना गडकरी यांनी यावेळी व्यक्त  करून महाराष्ट्रबद्दलचे आपले प्रेम दाखवून दिले.