Maharashtra

नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं तर ही वेळ आली नसती – गुलाबराव पाटील

By PCB Author

January 27, 2020

जळगाव,दि.२७(पीसीबी) – शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी “नाथाभाऊंनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं मात्र मुलगा कधी मानलं नाही, त्यामुळे ही वाईट वेळ आली” असं म्हणत भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे.

भुसावळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना “एकनाथ खडसेंनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता तर मी पक्का माणूस आहे. पिछे नही हटेगा” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

नाथाभाऊंनी अशा लोकांना सोबत ठेवलं त्यांचा रक्तग्रुप चेक केला नाही. जर त्यांनी रक्त ग्रुप चेक करून माणसं ठेवली असती तर गुलाबराव पाटील सारखा सच्चा माणूस कधी तुटला नसता, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.