Maharashtra

नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

May 21, 2020

मुंबई,दि.२१(पीसीबी) – नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

परदेशातून येणाऱ्या लोकांना वेळीच क्वारंटाईन Quarantine न केल्यामुळे देशात कोरोनचा Corona प्रसार झाला. यासाठी सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीच Narendra Modi जबाबदार आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी केली आहे. कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची Lockdown प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ते दुरुस्त करण्याच्या स्थितीमध्ये हे सरकार दिसत नाही. संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे. गरीब आणखी गरीब होतील,असंही ते म्हणाले.