Maharashtra

नक्षलवाद्यांबरोबर मध्यस्थी करण्यास तयार – अण्णा हजारे

By PCB Author

May 05, 2019

अहमदनगर, दि. ५ (पीसीबी) – नक्षलवाद्यांचा प्रश्न बंदुकीने सुटणार नाही. राज्य सरकार नक्षलवाद्यांशी चर्चेसाठी तयार असेल, तर आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत,  असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. अहमदनगरमध्ये  अण्णा हजारे माध्यमांशी बोलत होते.

नक्षलवादी काही बाहेरचे नाहीत. ते महाराष्ट्रात जन्मले, महाराष्ट्रातच राहतात. त्यांचे प्रश्न समजून घेऊन सरकारने चर्चेतून मार्ग काढायला हवा.  सरकार नक्षलवाद्यांशी चर्चेसाठी तयार असेल, तर आपण मध्यस्थी करण्यास तयार आहे.  सरकारने नक्षलवाद्यांशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, असेही अण्णा म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर हल्ला केला. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला  घडवून आणला होता.