Maharashtra

धक्कादायक: घरघुती कारणाच्या वादातून पोलीस नाईकाने दोघा सावत्र मुलांना घातल्या गोळ्या

By PCB Author

June 21, 2019

नाशिक, दि. २१ (पीसीबी) – शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय भोये यांनी घरगुती भांडणाच्या रागातून दोघा सावत्र मुलांवर गोळीबार केला. यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपी पोलीस नाईक संजय भोये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सोनू नंदकिशोर चिखलीकर (वय २५) आणि त्याचा भाऊ शुभम नंदकिशोर चिखलीकर असे मयत दोघांची नावे आहेत.

पंचवटी भागातील अश्वमेध नगर येथे राजमंदिर इमारतीत उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय अंबादास भोये यांच्यात आणि मुलांमध्ये भांडण झाले, हे भांडण इतके विकोपाला गेले की, वडिलांनी सावत्र मुलांवरच गोळीबार करत सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून ३ गोळ्या झाडल्या. यामध्ये सोनू दुसरा मुलगा शुभम हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. सोनू हा नौदलात कार्यरत होता, तर शुभम नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून संशयित आरोप पोलीस नाईक संजय भोये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.